Friday, June 30, 2023

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे - © सुयोग शहा


या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.  

© सुयोग शहा

जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकात, मार्ग तुम्हाला सापडत जाईल.


जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष आहे, जीवनाच अशा अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार असणार. जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु: असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात चालू राहण्यात जीवनाचे सार्थक आहे.


एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं,

हवं असतं तेच मिळत नसतं,

हवं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं,

चांदण्यांनी भरुनसुध्दा आभाळ आपलं रिकामं असतं.

खरे म्हणजे जगण्याइतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही. सर्व कला, क्रीडा, साहित्य, संगीत, शास्त्री संशोधन हे जीवनाचे विलास आविष्कार आहेत. त्यात जे रस घेतील त्यांना सविकल्प समाधीचे सुख लाभेल. हे सहज सौख्य माणसे विसरतात. खेळीमेळीच्या वातावरणात, विचारांच आकाशात आपापल्या मतांचे पतंग सोडावेत आणि प्रसंगी काटावेत, पण हा ऐश्र्वर्यछंद रंगपंचमीप्रमाणे सुखद सोहळाच ठरावा. जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहेतिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहेमाणसाने केवळ क्षुल्लक दु:खाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसू नयेत्याने एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावेलंगडय़ाचा पाय व्हावेअनाथाला पालकसुध्दा व्हावेदुसर्याला आनंद द्यावादुसर्यासाठी जगावेजगू द्यावेजगता जगता जीवनाकडे पाहावेजमेल तेवढे जाणावे या जाणिवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावेस्वत:ला विसरून अवैयक्तिक पातळीवरुन जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावा

माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि प्रयत्नपूर्वक जगावे. हे जग सुंदर व्हावे, यासाठी या जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने राहावे व रमावे. अशा जगण्यात जीवनाचा गौरव आहे. माणसांजवळ विचारशक्ती आहे. आचारशक्ती आहे, सदबुद्धी आहे. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवनब्रह्मचे रूप आपण सतत अनुभवत राहू. निरभ्र आणि अथांग आकाश, सूर्य, चंद्र यांचे उदात्त, सतत खळखळणारे  लहान मुलांचे हसणे, पायाशी घोटाळणार्‍या कुत्र्याचे इमान, थोडे प्रेमाचे बोलले की वृध्दांच्या नेत्रात तरळणारे अश्रू, एखादा रुपया हातावर ठेवला तर चार पिढय़ांना आशीर्वाद देणारा देवाच्या दारातील विकलांग भिक्षू, पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणारा घंटानाद, आभाळातून झेपावत जाणारे पाखरांचे थवे, शाळेच्या प्रांगणात बाळगोपाळांच्या कंठातून बाहेर पडणारे प्रार्थनागीत.. अशा अनेक अंगांनी नटलेले, सजलेले हे जीवन किती विलोभनीय आहे.

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळवा

झिजुनी स्वत: चंदनाने, दुसऱ्यास मधुगंध द्यावा ..

उगवत्या सूर्याला आनंदाचा अर्घ्य दिला की मावळताना तो खूप समाधान देऊन जातो. खरंतर, आनंद हा विनामूल्य मिळतो पण आपल्याला आयुष्यभर त्याचा पत्ताच नसतो. फुलपाखरु प्रत्येक फुलातून मधुकण गोळा करीत असतो तसेच आपण सुद्धा आयुष्यातल्या प्रत्येक कमार्तून आनंद वेचला, प्रत्येक परिस्थिती मध्ये आनंद शोधला चिंता करण्यापेक्षा चिंतन केले म्हणजे आपण आनंदानी भरभरून जावू यात काहीच शंका नाही.


जीवनातील अशा कितीतरी गोष्टी आपल्याला जगण्यासाठी उत्साह देतात. प्रेरणा देतात म्हणूनच आपणही प्रतिभासंपन्न कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुरात सूर मिसळून म्हणूया

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
या ओठांनी चुंबन घ्यावी हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी ..
या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे.

आनंद हा फुलपाखरासारखा असतो. त्याच्या मागे लागले की तो र पळतो व निवांत बसलो की तो अलगद आपल्याखांद्यावर येऊन बसतो. खरंच, आनंदाचं हे असंच असतं. भूतकाळातला मनस्ताप व भविष्यकाळातली चिंता केली की तो भुरकन उडून जातो मात्र वर्तमान काळात राहिले की आपल्या जवळ येऊन बसतो. अमूक एक वस्तू मिळलीकी मी आनंदी होईन या आपल्या सवयीमुळे आपण आयुष्यभर आनंदापासून  वंचित राहतो.  आयुष्यभर आपण आनंदला आपल्यापासून क्षणोक्षणी पुढे ढकलत असतो जसे की शिक्षण पूर्ण झाल्यावर, मनासारखी नोकरी मिळाल्यावर, लग्न झाल्यावर, मुले झाल्यावर, निवृत्त झाल्यावर खूप आनंदानी जगेन; पण आता मात्र खूप पैसा कमावेन या सबबीखाली आपलं संपूर्ण आयुष्यच निघून जातं व आपण जीवन जगण्याच्या शर्यतीत आनंदाला आपल्या सोबत घ्यायचे विसरुनच जातो. म्हणूनच आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात घालवायला पाहिजे. जेव्हा आपण निस्वार्थ प्रेम करतो, अपेक्षारहित जगतो, निष्काम कर्म करतो, ईश्वरीय सानिध्य प्रत्येक गोष्टीत अनुभवतो, समाधानी वृत्ती बाळगतो, प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवतो, इतरांशी अनावश्यक स्पर्धा टाळतो, क्षमाशील असतो व दुसऱ्यांसाठी जगतो तेव्हा आपल्याला जीवनात आनंद मिळत जातो. 

मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया... हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया”....

© सुयोग शहा